निवडणूक प्रक्रिया
प्रश्न 1 ला : दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
1) निवडणूक आयुक्तांची नेमणूक _______ करतात
अ) राष्ट्रपती ब) प्रधानमंत्री क) लोकसभा सभापती ड) उपराष्ट्रपती
उत्तर – अ) राष्ट्रपती
2) स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून _____ यांची नेमणूक झाली
अ) डॉ. राजेंद्रप्रसाद ब)टी.एन.शेषन क) सुकुमार सेन ड) नीला सत्यनारायण
उत्तर – क) सुकुमार सेन
3) मतदारसंघ मिर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ______ समिती करते.
अ) निवड ब) परिसीमन क) मतदान ड) वेळापत्रक
उत्तर – ब) परिसीमन
प्रश्न 2 रा : पुढील विधाने चूक कि बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
1) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.
उत्तर : बरोबर – निवडणुकीपूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे ते आचारसंहितेत स्पष्ट असते म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते.
2) विशिष्ठ प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात.
उत्तर : बरोबर – विधानसभा लोकसभा स्थानिक शासनसंस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीने राजीनामा दिल्यास अथवा एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाल्यास त्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेण्यात येतात. यास पोटनिवडणूक असे म्हणतात.
3) एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते
उत्तर : चूक – एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे निवडणूक आयोग ठरवते.
प्रश्न 3 रा : टिपा लिहा
- मतदारसंघाची पुनर्रचना – लोकसभेत एकूण 543 मतदारसंघ आहेत. हे सभासद कसे निवडून येतात? प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतो. म्हणजे लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते.
- मतपेटी ते इव्हीएम मशीनपर्यंतचा प्रवास – भारतात पहिली निवडणूक १९५०-५१ साली झाली. सुरुवातुपासून मतपेट्यांचा वापर केला जात होता. १९९० च्या दशकापासून इलेक्ट्रोनिक वोटिंग मशीन वापरण्यात येवू लागले. ते इव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर वरीलपैकी कोणीही नाही असे सांगणारा नोटा असा पर्यायही या मशीनने दिला. निवडणुकांचे निकाल इव्हीएम मशीनमुळे लवकर लागू लागले.
प्रश्न 5 वा : थोडक्यात उत्तरे लिहा.
1) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर – भारतीय संविधानाच्या कलम ३२४ ने निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली. या निवडणूक आयोगाची कार्ये खालीलप्रमाणे आहेत.
अ) मतदार याद्या तयार करणे – वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. तो बजावण्यासाठी त्याचे मतदार यादीत नाव असणे आवश्यक आहे. यासाठी मतदार याद्या तयार करणे, त्या अद्यावत तयार करणे, नव्या मतदारांचा समावेश करणे.
आ) निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे – कोणत्या राज्यात केव्हा आणि किती टप्प्यात निवडणुका घ्याव्यात हे निवडणूक आयोग ठरवतो.
इ) उमेदवारांच्या अर्जाची छाननी – निवडणूक प्रक्रियेत अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांच्या अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करतो व पात्र उमेदवारास निवडणूक लढवण्याची परवानगी देतो.
ई) राजकीय पक्षांना मान्यता देणे – आपल्या देशात बहुपक्ष पद्धती अस्थित्वात आहे. यामुळे नव्याने निर्माण होणाऱ्या पक्षांना मान्यता देण्याचे काम निवडणूक आयोग करतो. तसेच एखाद्या पक्षाची मान्यता काढून घेण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला आहे.
उ) निवडणुकांसंबंधीचे वाद सोडवणे – निवडणुकांसंबंधी काही वाद निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी हि निवडणूक आयोगाची असते.
2) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा.
उत्तर – भारतातील निवडणुका जास्त खुल्या आणि न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत, त्यात आचारसंहितेचा समावेश करता येईल. निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूकपूर्व काही काळ आणि निवडणुकीदरम्यान सरकार, राजकीय पक्ष वमतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचे पालन करावे हे आचारसंहितेत स्पष्ट केले आहे. या नियमांचा शासनालाही भंग करता येत नाही.
व्हिडियो